या सामन्यात नाणेफेक गमावलेल्या भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण मिळालं होतं. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने २० षटकांअखेर ७ गडी बाद १७५ धावा केल्या आहेत. भारतीय संघाकडून डावाची सुरूवात करण्यासाठी अभिषेक शर्मा आणि इशान किशनची जोडी मैदानावर आली.अभिषेक शर्मा पुन्हा एकदा शून्यावर माघारी परतला. पण त्यानंतर इशान किशनने भारतीय संघाचा डाव सांभाळला. इशान किशनने अवघ्या २७ चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. यासह त्याने ७७ धावांची खेळी केली. तर तिलक वर्माने २५ धावांची खेळी केली. तर सूर्यकुमार यादवने ३२ धावांची खेळी केली. शेवटी रिंकू सिंगने ११ धावा केल्या. या खेळीच्या बळावर भारती संघाने ७ गडी बाद १७५ धावा केल्या.